'क्रोम'
गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :)
गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्या वैयक्तिक संगणकांसाठी आहे. आता हे संगणक प्रवासातील प्रामुख्याने ई-मेल, चॅट, फोटो, ईंटरनेट ह्यासाठी उपयोगी पडतात. अर्थात त्यांच्यावर इतरही कामे करता येउ शकतील पण त्यांची शक्ती मुळात मर्यादितच असते. (ती तशी मर्यादित असण्याचे प्रमुख कारण म्हणजे वजनाला हलके आणि बराच जास्त वेळ चालणारी बॅटरी). आता अशा संगणकांमधे सध्यातरी XP ही प्रमुख आहे. एवढ्या कमी शक्तीच्या संगणकावर Vista चालणे महा-मुश्किल आणि Linux अजूनही सर्व-सामान्यांच्या पचनी पडलेली नाही - त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे प्राबल्य अधिक आहे. आता अशा परिस्थितीत गुगलने ह्या 'क्रोम' प्रणालीची घोषणा करताना सांगितले की 'नेटबुक' वर वापरण्याकरिता (प्रामुख्याने) ही बनविली जात आहे. पण नेमकी काय आहे ते अजून गुलदस्त्यातच आहे.
आता हे 'सिक्रेट' शोधून काढण्यासाठी थोडा विचार करुया. गुगलच्या अजून काय सेवा आहेत ? ई-मेल, डोक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, फोटो (पिकासा), व्हिडियो (YouTube), मॅप्स, कोड (apps). ह्या सगळ्या सेवांमधे वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स साठवायची सुविधा आहे. ई-मेल मधे 7GB आणि पिकासामधे 1GB आणि इतर अशा मिळून साधारण 10GB जागा मोफत मिळते आहे. आता ह्या सगळ्या सेवा कशा चालतात ? म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या कॅमेर्यामधून थेट गूगलकडे जात नाहीत. तुम्ही तुमच्या संगणकावर (hard drive) आधी ते उतरवून घेता आणि मग एक किंवा अनेक गुगलवर चढवता. म्हणजे तुमचा संगणक (आणि hard drive) एका मध्यस्थाचे काम करतो. आणि तुम्हाला मुद्दाम गुगलवर त्या फाईल्स चढवाव्या लागतात. तर माझा असा कयास आहे की 'क्रोम' हा 'मध्यस्थ' बनायच्या विचारात आहे.
म्हणजे थोड उलगडून सांगायच झाल तर - तुमच्या संगणकामधे काही फोल्डर्स आणि त्यात फाईल्स असतात. हे फोल्डर्स तुमच्या संगणकाच्या hard drive मधे साठविलेले असतात. क्रोम मधे 'ही hard drive' ची जागा गुगल घेणार असे मला वाटते आहे. म्हणजे तुम्ही तुमचे सदस्यनाव वगैरे दिलेत (आणि इंटरनेट जोडले असेल) की तुमच्या संगणकावर जे फोल्डर्स आणि फाईल्स दिसू लागतील ते प्रत्यक्षात साठविलेले असतील गुगलच्या स्टोरेजमधे. तिथून ती फाईल 'डाउनलोड' करुन तुमच्याच संगणकावर आहे असा आभास उत्पन्न केला जाईल. म्हणजे वापरकर्त्याच्या दृष्टीने काहीच वेगळे नसणार पण फाईलची साठवणूक मात्र 'क्लाउड' मधे (दुसरीकडेच कुठेतरी) - म्हणजे दुसर्या संगणकावरुन सुद्धा तुम्हाला त्याच सदस्यनावाने सगळ्या फाईल्स हाताळता येउ शकतील. संचालन प्रणाली (OS) हे सर्व तुमच्या नकळत घडवून आणेल.
आता प्रश्न येईल की ईटरनेट जोडणी नसेल तेव्हा ? पण त्यासाठी तुमच्याकडे hard drive असणे अपेक्षित आहे. (अर्थात संचालन प्रणाली OS चढवायची असेल (install) तर हार्ड ड्राईव्ह असायलाच हवी पण मग 'off-line' मोड मधे ही प्रणाली काम करेल असा माझा तर्क आहे. म्हणजे जेव्हा जाल जोडणी नसेल तेव्हा तुमच्या हार्ड ड्राईव्ह वर सर्व माहिती राहील आणि जाल जोडणी झाली की सर्व काही Sync केले जाईल 'क्लाऊड' मधल्या साठ्याबरोबर. म्हणजे परत तुम्ही तुमच्या सगळ्या फाईल्स कुठूनही हाताळायला मोकळे. :)
हे सर्व तर उत्तम आहे, पण ह्यात गुगलसाठी काय फायदा ? मला दोन फायदे दिसतात. एक म्हणजे Spread - जेवढे जास्त लोक तुमची उपकरणे वापरतील तेवढी तुमची Bargaining power (महत्त्व) जास्त. दुसरे म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या ह्या क्षेत्रातील वर्चस्वाला आव्हान. इतरही अनेक फायदे होउ शकतात - गुगलच्याच इतर सेवांबरोबर अधिक चांगली जोडणी (Integration), वापरकर्त्यांच्या सवयी वगैरेंचे अचूक ज्ञान (Usage patterns), इतर सेवादात्यांना एकतर गुगलशी जुळवून घ्या कीवा नामशेष व्हा असा संदेश (Implicit threat) वगैरे वगैरे...
मला वैयक्तिकरित्या उत्सुकता आहे ती दोन गोष्टींबद्दल - एक म्हणजे ही 'क्रोम' प्रणाली Linux वर आधारित असणारे आहे आणि मुक्त-स्त्रोत - म्हणजे हे सर्व त्यांनी कसे केले हे बघायला मिळेल आणि दुसरे म्हणजे त्यांनी जाहिर केल्याप्रमाणे संपूर्णपणे नवे बाह्य रुपडे (new user interface). सध्याच Linux मधे Gnome आणि KDE असे दोन सुंदर पर्याय मिळतायेत - त्यात अजून एकाची भर पडणारे - म्हणजे आमच्यासारख्या 'फुकट्या' लोकांची चांदीच की :)
गुगलसमोर माझ्यामते प्रमुख आव्हाने दोन आहेत - एक म्हणजे हार्डवेअर संलग्नता (compatibility) आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे मूळ (संगणक) निर्माणकर्त्यांची (OEM) ही प्रणाली लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा आणि तयारी. आत्ताच Asus, Lenovo, Acer वगैरे मंडळी 'नेटबुक्स' वर खुशीने फक्त XP देतायत - अगदी एखाद्याने मागितलेच तर Linux मिळते तर आता अजून क्रोम कुठून देणार ?
पण एकंदरीत 'फुकट्यां' साठी चांगले दिवस येणार असे दिसतेय - अर्थात गुगल त्याची किंमत कशी वसूल करेल ही भीती आहेच !
Monday, July 27, 2009
Thursday, November 22, 2007
"ती"
हे काही व्यक्तिचित्र नव्हे तर ह्या आहेत प्रकट झालेल्या भावना. ’ती’ कोण, नाव गाव काय असे प्रश्ण इथे गौण आहेत. थोड्याफ़ार प्रयत्नाने कोणालाही ह्यातले ’गुप्त’ details कळू शकतिल. पण ते उघड झाले तरी बिघडत काहीच नाही. माझ्या ह्या भावना प्रामाणिक आहेत ना एवढेच महत्त्वाचे.
तशी तिची आणि माझी ओळख उशिरानेच झाली. ती एक प्रसिद्ध लेखिका असली तरी मी त्या लिखाणाच्या वाटेला कधीच गेलो नव्हतो. म्हणजे तेव्हाचे माझे वय आणि आवडी बघता तसे काही पुस्तक उचलणे मी शक्यच नव्हते. लेखनाबरोबरच तिने स्त्रियांचे काही उपक्रम, आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील काही कार्यक्रमात सहभाग दिला होता.
इथे एका स्नेह्याकडे गप्पांचा कार्यक्रम होता तेव्हा तिच्याशी पहिली भेट. तिच्या पतीबरोबर आलेली ती. पहिल्या भेटीतच एक हसरेपणा जाणवला तिच्या व्यक्तिमत्वात पण त्यापलिकडे काहीच नाही. तिचे यजमान म्हणजे दिसायला अगदी युरोपियन साहेब. उंच, गोरे, घारे आणि विचारांत एक प्रकारचा ठामपणा. म्हणजे हटवादीपणा नव्हे तर आपण काय बोलतो आहोत ह्याची पूर्ण जाणिव.
कशी कोण जाणे गप्पांची गाडी पु. लं. वर येउन पोचली आणि तीच्या यजमानांनी एक विधान केले " पु. लं. ना काही मी विचारवंत वगैरे मानत नाही....". झालं. आमच्या पु. ल. प्रेमाला पहिली ठेच बसली. त्यावेळी वयाची एवढी परिपक्वता नव्हती आणि त्यांच्या स्वभावाशीही परिचय नव्हता. मी माझ्या (नेहेमीच्या) सवयीने उसळून त्यांना म्हणालो "कशावरुन.....". बहुतेक एखाद्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया त्यांना अपेक्षितच असावी. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कटुता न निर्माण होता चर्चा पुढे चालू राहीली. त्यावेळी ती आतमधे गृहस्वामिनीबरोबर स्वैपाकचे बघत होती. म्हणून तिची मते कळू शकली नाहीत. पण त्या दिवशीच्या गप्पांमधून त्या उभयतांशी वैयक्तिक परिचय होण्याइतपत मैत्री झाली.
पुढे तिच्या संदर्भात अधिक माहिती मिळत गेली. एका असाध्य आजाराशी तीने दिलेल्या यशस्वी सामन्याशी हकिकत कळल्यावर तर आदर आणि कुतूहल अधिकच वाढले. त्यात एका दिवशी तीच्या घरचे आम्हाला आणि त्या स्नेह्यांना बोलावणे आले. काही कारणामुळे स्नेही येउ शकत नव्हते म्हणुन मग आमच्याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. लक्षात आले - व्यक्तिमत्व जबरदस्त आहे, अर्थात यजमानही तोडीसतोड होते. पण तरी एक प्रकारची ऋजुता होती दोघांच्याही वागण्या बोलण्यात. ते दोघे केव्हा आमचे ’काका मावशी’ झाले ते कळलेच नाही.
त्या दिवशीच्या भेटीने ऋणानुबंध जुळले त्याला अजून एक (स्वार्थी) कारण म्हणजे - तीच्या कडे असलेला असंख्य पुस्तकांचा साठा. मराठी इंग्रजी दोन्ही पण मी लगेच त्यातली काही मराठी पुस्तके उचलून आणली. अतिशय वेगवेगळ्या विषयांची पुस्तके - म्हणजे लेखक, विषय, प्रकाशन साल - नेमके नाव महिती नसेल तर मिळूही शकणार नाहीत अशी. प्रविण पाटकरांचे ’सति’, सदा कर्हाड्यांचे "जेव्हा मी जात चोरली होती", एक समिक्षे वरचे पुस्तक. (’सति’ बद्दल वेगळा लेख लिहावा इतके वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे ते...). माझ्या आत्तापर्यंतच्या चाकोरीबद्ध वाचनाला एक वेगळीच दिशा, दृष्टी मिळाली. ह्यातली बरीच पुस्तके तिला प्रत्यक्ष लेखकांनी भेट म्हणून, अभिप्रायार्थ, स्वाक्षरी करुन दिलेली होती. तिच्याबरोबर आपले जुळणार ह्याची खुण गाठ तिथेच पक्की झाली.
(क्रमशः)
तशी तिची आणि माझी ओळख उशिरानेच झाली. ती एक प्रसिद्ध लेखिका असली तरी मी त्या लिखाणाच्या वाटेला कधीच गेलो नव्हतो. म्हणजे तेव्हाचे माझे वय आणि आवडी बघता तसे काही पुस्तक उचलणे मी शक्यच नव्हते. लेखनाबरोबरच तिने स्त्रियांचे काही उपक्रम, आकाशवाणी आणि दूरदर्शन वरील काही कार्यक्रमात सहभाग दिला होता.
इथे एका स्नेह्याकडे गप्पांचा कार्यक्रम होता तेव्हा तिच्याशी पहिली भेट. तिच्या पतीबरोबर आलेली ती. पहिल्या भेटीतच एक हसरेपणा जाणवला तिच्या व्यक्तिमत्वात पण त्यापलिकडे काहीच नाही. तिचे यजमान म्हणजे दिसायला अगदी युरोपियन साहेब. उंच, गोरे, घारे आणि विचारांत एक प्रकारचा ठामपणा. म्हणजे हटवादीपणा नव्हे तर आपण काय बोलतो आहोत ह्याची पूर्ण जाणिव.
कशी कोण जाणे गप्पांची गाडी पु. लं. वर येउन पोचली आणि तीच्या यजमानांनी एक विधान केले " पु. लं. ना काही मी विचारवंत वगैरे मानत नाही....". झालं. आमच्या पु. ल. प्रेमाला पहिली ठेच बसली. त्यावेळी वयाची एवढी परिपक्वता नव्हती आणि त्यांच्या स्वभावाशीही परिचय नव्हता. मी माझ्या (नेहेमीच्या) सवयीने उसळून त्यांना म्हणालो "कशावरुन.....". बहुतेक एखाद्या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया त्यांना अपेक्षितच असावी. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कटुता न निर्माण होता चर्चा पुढे चालू राहीली. त्यावेळी ती आतमधे गृहस्वामिनीबरोबर स्वैपाकचे बघत होती. म्हणून तिची मते कळू शकली नाहीत. पण त्या दिवशीच्या गप्पांमधून त्या उभयतांशी वैयक्तिक परिचय होण्याइतपत मैत्री झाली.
पुढे तिच्या संदर्भात अधिक माहिती मिळत गेली. एका असाध्य आजाराशी तीने दिलेल्या यशस्वी सामन्याशी हकिकत कळल्यावर तर आदर आणि कुतूहल अधिकच वाढले. त्यात एका दिवशी तीच्या घरचे आम्हाला आणि त्या स्नेह्यांना बोलावणे आले. काही कारणामुळे स्नेही येउ शकत नव्हते म्हणुन मग आमच्याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. लक्षात आले - व्यक्तिमत्व जबरदस्त आहे, अर्थात यजमानही तोडीसतोड होते. पण तरी एक प्रकारची ऋजुता होती दोघांच्याही वागण्या बोलण्यात. ते दोघे केव्हा आमचे ’काका मावशी’ झाले ते कळलेच नाही.
त्या दिवशीच्या भेटीने ऋणानुबंध जुळले त्याला अजून एक (स्वार्थी) कारण म्हणजे - तीच्या कडे असलेला असंख्य पुस्तकांचा साठा. मराठी इंग्रजी दोन्ही पण मी लगेच त्यातली काही मराठी पुस्तके उचलून आणली. अतिशय वेगवेगळ्या विषयांची पुस्तके - म्हणजे लेखक, विषय, प्रकाशन साल - नेमके नाव महिती नसेल तर मिळूही शकणार नाहीत अशी. प्रविण पाटकरांचे ’सति’, सदा कर्हाड्यांचे "जेव्हा मी जात चोरली होती", एक समिक्षे वरचे पुस्तक. (’सति’ बद्दल वेगळा लेख लिहावा इतके वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे ते...). माझ्या आत्तापर्यंतच्या चाकोरीबद्ध वाचनाला एक वेगळीच दिशा, दृष्टी मिळाली. ह्यातली बरीच पुस्तके तिला प्रत्यक्ष लेखकांनी भेट म्हणून, अभिप्रायार्थ, स्वाक्षरी करुन दिलेली होती. तिच्याबरोबर आपले जुळणार ह्याची खुण गाठ तिथेच पक्की झाली.
(क्रमशः)
Thursday, November 8, 2007
भारत आणि पाकिस्तान
एकाच दिवशी स्वतंत्र झालेले दोन देश. एक आज ’प्रगतीच्या अधिकच उच्च पथावर’ आहे तर दुसरा हुकूमशाहीच्या गर्तेत. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या भावंडांचे नशिब जसे वेगवेगळे निघावे त्यातलाच हा प्रकार.
मला स्वत:ला ’नेते’ हा प्रकार अजिबात आवडत नाही. देशाच्या ’ह्या’ अवस्थेला जबाबदार हि नेते मंडळीच असतात. पण पाकिस्तान कडे बघितल्यावर आपल्याकडचे नेतेही कितीतरी चांगले वाटू लागतात. हा पाकिस्तानचा ’सर्वेसर्वा’ म्हणजे विरोधाभासाचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. आधी पंतप्रधानाला पदच्युत करुन सत्ता बळकवायची, मग एकीकडे लष्करी गणवेष उतरुन ठेवतो म्हणत निवडणुका घोषित करायच्या आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात जाइल ह्याची कल्पना येताच ’आणिबाणि’ जाहिर करायची. मस्त रे कांबळे :)
मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं - आपल्या वागण्यातली एवढी मोठी विसंगती ह्यांच्या लक्षात कशी येत नाही ? का ह्यांची कातडी इतकी जाड आहे ? आणि लोकांचे काय ? त्यांना कळते की नाही हे ? का लोक आपली रोजीरोटी मिळवण्यातच इतके गुंतलेले आहेत की ह्या गोष्टी दिसून सुद्धा त्यांना त्याबाबतीत काहीही करावेसे वाटत नाही ? का एवढी दहशत आहे ?
भारतात बाकी काहीही असले तरी (कुठल्याही गोष्टीवर) आपले मत व्यक्त करायची मुभा आहे आणि लोकं ते करतात सुद्धा. एखाद्या शहरातले लोक इतरांपेक्षा ही सुविधा जास्त वापरत असतील :) पण अगदी कोणावरही टीका होते आणि कशाही भाषेत होउ शकते. टीकाकारांची मुस्कटदाबी झाल्याचे अजूनतरी वाचनात आले नाही. भारतातही आणिबाणिचा प्रयोग एकदा झाला होता. त्यावेळेची परिस्थिती निराळी होती असे कदाचित म्हणता येईल. पण सर्व थरांतून त्या आणिबाणिला विरोध झाला होता. साहित्यिक, कवी, एवढेच नव्हे तर सर्व सामान्य जनताही रस्त्यावर उतरुन निषेधाच्या घोषणा देत होती. देशाच्या सुदैवानी इंदिराजींना लवकर सुबुद्धी सुचली आणि ते काळे पर्व संपले.
ह्या पाकिस्तानच्या बाबतीत ’ज्याचे त्याचे नशिब’ - असे म्हणून मोकळे होता येईलही कदाचित पण ह्या सगळ्या अस्थिरतेचा भारतावर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार ? भारताचे सगळे शेजारी आज कुठल्यातरी (बहुतकरुन हुकूमशाहीच्याच) आवर्तात सापडलेले दिसतायत. पाकिस्तान मधे ही कथा, ब्रह्मदेशात तेच, श्रीलंकेत वांशिक हिंसाचार, नेपाळ मधे राजेशाही चे तमाशे, बांगलादेशातली राजकीय अस्थिरता... ह्या सगळ्याचे गंभिर परिणाम आज ना उद्या भारतावर होणारच आहेत, कशा प्रकारे ’द्दृग्गोच्चर’ होतात एवढेच कळायचे बाकी आहे.
असो
शुभ दीपावली सर्वांना....
मला स्वत:ला ’नेते’ हा प्रकार अजिबात आवडत नाही. देशाच्या ’ह्या’ अवस्थेला जबाबदार हि नेते मंडळीच असतात. पण पाकिस्तान कडे बघितल्यावर आपल्याकडचे नेतेही कितीतरी चांगले वाटू लागतात. हा पाकिस्तानचा ’सर्वेसर्वा’ म्हणजे विरोधाभासाचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. आधी पंतप्रधानाला पदच्युत करुन सत्ता बळकवायची, मग एकीकडे लष्करी गणवेष उतरुन ठेवतो म्हणत निवडणुका घोषित करायच्या आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात जाइल ह्याची कल्पना येताच ’आणिबाणि’ जाहिर करायची. मस्त रे कांबळे :)
मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं - आपल्या वागण्यातली एवढी मोठी विसंगती ह्यांच्या लक्षात कशी येत नाही ? का ह्यांची कातडी इतकी जाड आहे ? आणि लोकांचे काय ? त्यांना कळते की नाही हे ? का लोक आपली रोजीरोटी मिळवण्यातच इतके गुंतलेले आहेत की ह्या गोष्टी दिसून सुद्धा त्यांना त्याबाबतीत काहीही करावेसे वाटत नाही ? का एवढी दहशत आहे ?
भारतात बाकी काहीही असले तरी (कुठल्याही गोष्टीवर) आपले मत व्यक्त करायची मुभा आहे आणि लोकं ते करतात सुद्धा. एखाद्या शहरातले लोक इतरांपेक्षा ही सुविधा जास्त वापरत असतील :) पण अगदी कोणावरही टीका होते आणि कशाही भाषेत होउ शकते. टीकाकारांची मुस्कटदाबी झाल्याचे अजूनतरी वाचनात आले नाही. भारतातही आणिबाणिचा प्रयोग एकदा झाला होता. त्यावेळेची परिस्थिती निराळी होती असे कदाचित म्हणता येईल. पण सर्व थरांतून त्या आणिबाणिला विरोध झाला होता. साहित्यिक, कवी, एवढेच नव्हे तर सर्व सामान्य जनताही रस्त्यावर उतरुन निषेधाच्या घोषणा देत होती. देशाच्या सुदैवानी इंदिराजींना लवकर सुबुद्धी सुचली आणि ते काळे पर्व संपले.
ह्या पाकिस्तानच्या बाबतीत ’ज्याचे त्याचे नशिब’ - असे म्हणून मोकळे होता येईलही कदाचित पण ह्या सगळ्या अस्थिरतेचा भारतावर काय परिणाम होणार आहे ह्याचा विचार ? भारताचे सगळे शेजारी आज कुठल्यातरी (बहुतकरुन हुकूमशाहीच्याच) आवर्तात सापडलेले दिसतायत. पाकिस्तान मधे ही कथा, ब्रह्मदेशात तेच, श्रीलंकेत वांशिक हिंसाचार, नेपाळ मधे राजेशाही चे तमाशे, बांगलादेशातली राजकीय अस्थिरता... ह्या सगळ्याचे गंभिर परिणाम आज ना उद्या भारतावर होणारच आहेत, कशा प्रकारे ’द्दृग्गोच्चर’ होतात एवढेच कळायचे बाकी आहे.
असो
शुभ दीपावली सर्वांना....
Thursday, November 1, 2007
नविन पुस्तके
सध्या २-३ पुस्तके एकदम वाचतो आहे. एक म्हणजे बरेच दिवस वाचायच ठरविलेल डॉ. रवि बापट ह्यांच "वॉर्ड नं ५" आणि दुसरं एक इंग्रजी Carpet Wars
बापटांच्या पुस्तकाविषयी विशेष वाटण्याचे कारण म्हणजे बापट आमच्या लांबच्या नात्यातले - म्हणजे त्यांच्याशी थोडाफ़ार परिचय झालेला. अर्थात ते वयाने आणि अधिकारानेही मोठेच त्यामुळे फार जवळिक झाली नाही पण माणूस आवडला अणि शिवाय ते एक प्रथितयश डॉक्टर. दोन्हीमुळे पुस्तकाबद्दल उत्सुकता होतीच आणि अजिबात निराशा झाली नाही. पुस्तकात खळबळजनक काही नसले तरी त्यांचे अनुभव मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. KEM मधे काम करताना आलेले रुग्णांचे, आजारांचे आणि परिस्थितीचे वैचित्र्यपूर्ण अनुभव साध्या सोप्या ओघवत्या भाषेत मांडले आहेत. वेगळ्या विषयावरचे वाचनिय पुस्तक...
Carpet wars बद्दल उद्या....
बापटांच्या पुस्तकाविषयी विशेष वाटण्याचे कारण म्हणजे बापट आमच्या लांबच्या नात्यातले - म्हणजे त्यांच्याशी थोडाफ़ार परिचय झालेला. अर्थात ते वयाने आणि अधिकारानेही मोठेच त्यामुळे फार जवळिक झाली नाही पण माणूस आवडला अणि शिवाय ते एक प्रथितयश डॉक्टर. दोन्हीमुळे पुस्तकाबद्दल उत्सुकता होतीच आणि अजिबात निराशा झाली नाही. पुस्तकात खळबळजनक काही नसले तरी त्यांचे अनुभव मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. KEM मधे काम करताना आलेले रुग्णांचे, आजारांचे आणि परिस्थितीचे वैचित्र्यपूर्ण अनुभव साध्या सोप्या ओघवत्या भाषेत मांडले आहेत. वेगळ्या विषयावरचे वाचनिय पुस्तक...
Carpet wars बद्दल उद्या....
Tuesday, October 30, 2007
मराठी अनुदिनी
नमस्कार
मराठी ’अनुदिनी’ सुरु करण्याचा विचार डोक्यात बर्याच दिवसांपासून होता. अखेर आज मुहूर्त लागला. इथे खास काही भरीव साहित्यिक वगैरे लिहिण्याचा विचार नसून सहज मनात आलेलं तुमच्यापुढे मांडणार आहे. विषयाचे बंधन नसेलच पण नियमिततेचेही ठेवलेले नाहीये. :)
बर्याच वेळेला या ना त्या निमित्ताने काही काही विचार डोक्यात येत असतात. ते त्या त्या वेळीच नोंदवले गेले नाहीत तर नंतर राहूनही जाते आणि त्यातली गंमतही कमी होते. अशा वेळी ’अनुदिनी’ हा प्रकार उपयोगी पडेल असे वाटते. ’मराठी ब्लॉग विश्व' आता वयात येते आहे, ह्या सुमुहूर्तावर आपलीही एक अक्षता असावी एवढाच प्रयत्न...
मराठी ’अनुदिनी’ सुरु करण्याचा विचार डोक्यात बर्याच दिवसांपासून होता. अखेर आज मुहूर्त लागला. इथे खास काही भरीव साहित्यिक वगैरे लिहिण्याचा विचार नसून सहज मनात आलेलं तुमच्यापुढे मांडणार आहे. विषयाचे बंधन नसेलच पण नियमिततेचेही ठेवलेले नाहीये. :)
बर्याच वेळेला या ना त्या निमित्ताने काही काही विचार डोक्यात येत असतात. ते त्या त्या वेळीच नोंदवले गेले नाहीत तर नंतर राहूनही जाते आणि त्यातली गंमतही कमी होते. अशा वेळी ’अनुदिनी’ हा प्रकार उपयोगी पडेल असे वाटते. ’मराठी ब्लॉग विश्व' आता वयात येते आहे, ह्या सुमुहूर्तावर आपलीही एक अक्षता असावी एवढाच प्रयत्न...
Subscribe to:
Posts (Atom)